🕒 1 min read
मुंबई : काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मला भेटणारे शेतकरी आजही मला कृषिमंत्री समजतात, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, या विधानाचा संदर्भ देत आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे. तसेच शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानांवर पडणार आहे का पवार साहेब?, असा सवालही सदाभाऊ यांनी केला आहे.
ऊस जळल्यामुळे आक्रोश व्यक्त करणाऱ्या, मरणाची याचना करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ ट्विट करत या व्हिडिओला पवार याचं विधान उपरोधिकपणे सदाभाऊ खोत यांनी जोडलेले आहे.
यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की, ‘महावितरणच्या गलिच्छ कारभारामुळे ऊस पार जळाल्याने आता काय करावं म्हणत, जळालेला ऊस हातात घेऊन मरण्याचा पर्याय राहिलाय असं सुचवणाऱ्या त्या बाई सारख्या शेतकऱ्यांचा आक्रोश कधी तुमच्या बंद कानावर पडणार आहे का पवार साहेब? भेटतात का साहेब तुम्हाला असे शेतकरी?’, असे खोत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 MI vs RR : दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता; वाचा संभाव्य Playing XI!
- ‘त्या’ ट्वीट वर संजय राऊतांचे स्प्ष्टीकरण; म्हणाले,”मी त्या दिवसापुरतं बोलायचं नाही…”
- “हे कमर्शियल आर्टिस्ट येतात अन्..” कुशल बद्रिकेने सांगितला सिद्धार्थ जाधवचा किस्सा
- “आम्हाला बोलवलं नाही तरी चालेल पण मेट्रो सुरु करा”- देवेंद्र फडणवीस
- “…त्यामुळे काहीजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारतात”, मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
