🕒 1 min read
मुंबई: IPL 2022 चा सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या सामन्यात पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला. १९ व्या षटकात श्रेयसने व्यंकटेशकडे चेंडू सोपवला. ज्यांच्या ओव्हरमध्ये आरसीबीने हा सामना जवळपास जिंकला. पराभवानंतर श्रेयसने या मागचे कारण सांगितले आहे.
व्यंकटेश अय्यरने (venkatesh iyer) १९व्या षटकात १० धावा दिल्या. ज्यात गोलंदाज हर्षल पटेलनेही २ चौकार मारले. श्रेयसचा (shreyas iyer) हा निर्णय चुकीचा ठरला. ज्यावर श्रेयस अय्यर म्हणाला, “आम्हाला लवकर काही विकेट्स मिळवायच्या होत्या पण मधल्या षटकांमध्ये विरोधी फलंदाजांनी चांगला खेळ केला. कठीण परिस्थितीतून ते पटकन बाहेर पडले. शेवटी, मी वेंकी (व्यंकटेश अय्यर) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. विशेषत: स्पर्धेच्या सुरुवातीला तुम्ही त्यांना सपोर्ट करणे आवश्यक आहे. त्याने लवकरात लवकर आत्मविश्वास मिळवणे खरोखर महत्वाचे आहे.”
आयपीएलच्या सामन्यांमध्ये उत्साह आहे. खुद्द KKR संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनेही याची कबुली दिली आहे. जिंकणे आणि हरणे हा सामन्याचा भाग आहे. एखाद्या सामन्यात संघ जिंकणे स्वाभाविक आहे. खेळाडूंनी पराभवाने निराश होऊ नये, तर पराभवातून धडा घेऊन अधिक भक्कमपणे पुढे जावे. असे श्रेयस अय्यरचे म्हणणे आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- “…पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू”, नाना पटोलेंचा इशारा
- IPL 2022: सामना जिंकताच फाफचे मोठे वक्तव्य; म्हणाला ‘दिनेश कार्तिक धोनी सारखा…’
- “भारत देश हा फक्त कफ परेड आणि अंधेरीदरम्यान..” सलमान खानचे व्यक्तव्य चांगलेच चर्चेत
- “शरद पवार विरोधी पक्षांचे भीष्म पितामह पण…”, UPA अध्यक्षपदाच्या चर्चेवर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
- “नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही” – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
