Share

“…तर अजूनही अनिल देशमुखांना पुन्हा गृहमंत्री करता येईल”, भातखळकरांचा राऊतांना खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आज (२२ मार्च) नागपूर दौऱ्यावर आहेत. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास आजपासून सुरुवात होणार आहे. यात शिवसेनेचे सर्व खासदार विदर्भ आणि मराठवाडा दौरा करणार आहेत. त्यासाठीच संजय राऊत (Sanjay Raut ) नागपूर मध्ये पोहोचले आहेत. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती, असे म्हटले. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar ) यांनी संजय राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे.

“अनिल देशमुखांचा राजीनामा घेणे ही चूक होती असे संजय राऊत यांना वाटत असेल तर अजूनही अनिल देशमुख यांना पुन्हा गृहमंत्री करता येईल. फक्त शपथविधी जेलमध्ये पार पडेल एवढंच.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

नेमके संजय राऊत काय म्हणाले?

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. तो निर्णय घाईघाईने झाला असे मला वाटते. त्यांच्यासंदर्भात काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिले आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिले आहे. तसेच तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!