🕒 1 min read
मुंबई : आज (२२ मार्च) विधान परिषदेत विरोधकांच्या प्रस्तावावर सुरू असलेल्या चर्चेत आमदार संजय दौंड (Sanjay Daund) यांनी संहभाग घेतला. यावेळी बोलत असतांना ते म्हणाले की,’राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून येत्या दोन राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून येत्या दोन वर्षात ग्रामीण भागात १० हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून साडेसहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याच्या योजनेसाठी शासनाने ७ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बीड जिल्ह्यातील रस्त्याला मागील पाच वर्षात मंजुरी मिळाली असताना त्याची पूर्तता झालेली नाही. ती कामे आता पूर्ण होत आहेत. मागील काळात कामे झालेली नसताना आता महाविकास आघाडी सरकारला नावं ठेवण्याचे काम होत आहे.’
तसेच राज्य सरकारने वाईनच्या संदर्भात निर्णय घेतला त्यावर विरोधकांनी टीका केली. मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह वाईनरी उद्योगावर आहे. त्यामुळे यास विरोध केल्यास त्यांच्या शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ येईल, असा इशाराही दौंड यांनी दिला.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कोरोना काळात जी मुले अनाथ झाली त्यांना पाच लाखांची मदत राज्य सरकारने केली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले त्यांना ५० हजार रुपये देण्यात आले. आजवर एक लाखाहून अधिक कुटुंबीयांच्या खात्यावर ५०० कोटींच्यावर निधी वाटप केला आहे.’ तसेच पशुधन विमा योजनेअंतर्गत पशु पालकांना विमा कवच देणे गरजेचे आहे. मराठवाड्यात लाल कंधारी, देवनी आणि पश्चिम महाराष्ट्रात खिलार जातीच्या बैलांच्या संवर्धनासाठी वळू माता प्रक्षेत्र निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : चाहत्यांसाठी खुशखबर..! यंदाच्या हंगामात सुरेश रैनाची होणार एन्ट्री; वाचा सविस्तर
- VIDEO : अय्यो..! महिलांच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये घेतलेला ‘हा’ अद्भुत झेल तुम्ही पाहिला का?
- “…यावरही संजय राऊतांनी कधीतरी लेख लिहावा”, पडळकरांचा खोचक टोला
- “…तर आता गॅस दरवाढ करण्याची आवश्यकता काय?”, महेश तपासेंचा सवाल
- Women’s WC 2022: स्नेह राणाला आऊट केल्यानंतर बांगलादेशी खेळाडूचे ‘असे’ सेलिब्रेशन; व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
