🕒 1 min read
मुंबई:पाकिस्तानमध्ये २९ मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि १ टी-20 सामन्यावर भीतीचे सावट निर्माण केले आहे. पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या सरकारविरोधात सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय आणि T20 मालिकेवर दिसून आला. पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी याला दुजोरा दिला आहे.
रावळपिंडी येथील क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ वनडे आणि एक टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांना इस्लामाबादमध्ये थांबावे लागले. कारण इथून पिंडी क्रिकेट स्टेडियमचे अंतर फक्त १० किलोमीटर आहे. पण, इस्लामाबादचा राजकीय मूड ज्या प्रकारे बदलला आहे आणि विरोधक इम्रान (imran khan) सरकारविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे पाहता, आता इस्लामाबादमध्ये राहण्याची आशा फारच कमी आहे, त्यामुळे पीसीबी लाहोरला पर्यायी ठिकाण सामने हलवत आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीदअहमद यांनी शुक्रवारी याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “राजधानीतील राजकीय घडामोडीमुळे सामने लाहोरला हलवले जात आहेत.” ऑस्ट्रेलियाचा संघ २४ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये कसोटी सामना खेळण्यासाठी गेला आहे. जिथे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. अजून एक सामना खेळायचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संघांना कोणतीही धमकी मिळालेली नाही. पण, एकदिवसीय आणि T20I मालिका लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजू शेट्टी भाजपसोबत येणार का?’; बघा काय म्हणाले फडणवीस
- “आम्ही भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत”- चंद्रकांत पाटील
- IPL 2022: ‘या’ युवा स्टार गोलंदाजाने दर्शवली इच्छा; म्हणाला ‘धोनीनंतर आता विराटला आऊट करायचे’
- ‘द कश्मीर फाइल्स’ बघून राखी सावंत ढसाढसा रडली; म्हणाली….
- “औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकणाऱ्यांसोबत आघाडी कशी होऊ शकते?”- संजय राऊत

