🕒 1 min read
नवी दिल्ली: आज पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालाचा दिवस आहे. चार राज्यांत भाजप आघाडीवर असून भाजप कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष केला जात आहे. आता त्यात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) आता विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येईल असे म्हटले आहे.
मतदान झालेल्या राज्यांमधील कोविडची सद्यस्थिती पाहता, आयोगाने मतमोजणी दरम्यान आणि नंतर विजयी मिरवणुकीवरील मार्गदर्शक तत्त्वे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि विजय मिरवणुकीवरील बँकेट बंदी मागे घेतली आहे. त्यामुळे आता विजयी उमेदवार आपला आनंद साजरा करू शकतात.
दरम्यान युपीत भाजपला बहुमत मिळाले असून २७४ जागांनी भाजप आघाडीवर आहे. तसेच उत्तराखंड मध्येही भाजप आघाडीवर आहे.तर पंजाब मध्ये आप पक्षाने दणदणीत विजय मिळविला आहे. दरम्यान गोव्यातही भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंत झाला भावनिक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
-
अबब! कुठलाही अलंकार, व्याकरण कमी पडतंय; भाजपच्या यशावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
-
“…नव्या ऊर्जेने पुढे जायचे आहे”- प्रियंका गांधीची भावनिक पोस्ट
- ‘आप’ देशातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसची जागा घेईल; ‘आप’चा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
