Share

OBC Reservation : “…तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती”, राम सातपुतेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. यावरूनच भाजप नेते राम सातपुते यांनी ठाकरे सरकारवर (Ram Satpute criticizes Thackeray government) टीका केली आहे.

“जेवढ्या तळमळीने राज्य सरकारचे मंत्री वसुली करतात त्याऐवजी तेवढीच तळमळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात दाखवली असती तर ओबीसींची राजकीय हानी टळली असती.”, असा खोचक टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.

दरम्यान भाजपने आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, अशी मागणी केली आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आता तरी गंभीर व्हावे. पण ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याला आमचा तीव्र विरोध असेल. यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला तरी आम्ही तो करू. भाजपा ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील. असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावरून भाजप- मविआ असा संघर्ष पेटला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!