Share

“मोदींनी शिवजयंतीला महाराष्ट्राची माफी मागवी”, नाना पटोलेंची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशात कोरोना संक्रमणाला कॉंग्रेस आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. यावरून राज्यात संतापाची लाट उसळली होती. मात्र आता पुन्हा एकदा कॉंग्रेसने हा मुद्दा लावून धरला आहे. आता शिवजयंतीला मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

नाना पटोले काल (१७ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी व भाजपने महाराष्ट्राची माफी मागावी, यासाठी काँग्रेसच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मुंबई व इतर काही जिल्ह्यांत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर या आंदोलनाचाच पुढचा टप्पा म्हणजे मोदी यांनी माफी मागावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्रे पाठविण्यात येतील.”

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिल्लीचे तख्त आणि अहंकारी इंग्रजांसमोर कधीही झुकला नाही. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेसमोर गुडघे टेकून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळू नका, राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माफी मागून तुमच्या पापाचे प्रायश्चित करा, अशा आशयाचे पत्र देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!