Share

रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अंडर १९ कर्णधार यश धुलचे शतक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारताला अंडर १९ जिंकून देणाऱ्या यश धुलने दिल्लीसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ज्यात धुलने गुवाहाटी येथे तामिळनाडूविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शानदार शतक ठोकले आहे. यासह यश , सचिन तेंडुलकर, अमोल मुजुमदार, रोहित शर्मा आणि इतर अनेक दिग्गजांचा समावेश असलेल्या रणजी ट्रॉफी पदार्पणात शतक नोंदविणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या प्रतिष्ठित यादीत सामील झाला आहे.

दिल्लीसाठी सलामीला पाठवलेल्या यश धुलने अवघ्या १३३ चेंडूत १६ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. सामन्यात तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ९७ धावांवर असताना एम मोहम्मदने धुलला बाद केले पण चेंडू नो-बॉल ठरला आणि दिल्लीच्या युवा फलंदाजाला दिलासा मिळाला. त्यानंतर यशने शानदार खेळी करत शतक पूर्ण केले.

यश धुलने भारताला विक्रमी पाचव्या वेळेस अंडर १९ विश्वचषकात विजय मिळवून दिला होता. तसेच त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये यश धूल दिल्ली संघात गेला आहे. यंदा रणजी करंडक स्पर्धा दोन टप्प्यात होणार आहे. यात प्री-आयपीएल टप्पा १० फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत चालेल. तर आयपीएलनंतरचा टप्पा ३० मे ते २६ जून या कालावधीत चालेल. रणजी ट्रॉफी या मोसमात ६२ दिवसांत ६४ सामने खेळवले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!