🕒 1 min read
मुंबई: कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ६ गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळूनही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संतापलेला दिसला. त्याने संघातील काही खेळाडूंवर राग दर्शवला आहे.
पहिल्या टी २० सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला विजयासाठी १५८ धावांचे लक्ष्य दिले होते. जे टीम इंडियाने पूर्ण केले. परंतु यादरम्यान काही खेळाडू धावा करण्यास अपयशी ठरले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहली १७ धावा करून बाद झाला आणि ऋषभ पंत ८ धावा करून बाद झाला. या दोन्ही फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे टीम इंडिया अडचणीत सापडली. मात्र नंतर सूर्यकुमार यादव आणि व्यकंटेश अय्यरने पारी सांभाळली.
सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने नाव न घेता संताप व्यक्त केला आहे. तो म्हणाला ” फलंदाजांना अजून थोडी सुधारणा करण्याची गरज आहे. इथूनही खूप काही शिकायला मिळाले. श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूला बाहेर ठेवणे खूप अवघड आहे, पण आम्हाला प्लेइंग इलेव्हनमध्ये अशा व्यक्तीची गरज होती जो मधल्या ओव्हरमध्येही गोलंदाजी करू शकेल.’ रोहितने यावेळी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र तो रागात दिसला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- विलियम्सच्या लहान मुलीसोबत फोटो शेअर करत वॉर्नरने केली भावनिक पोस्ट
- ‘चांदीवाल आयोगाच्या समोर माझी बाजू मांडणार’ – नवाब मलिक
- संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला हजारोंची गर्दी; मग शिवजयंती उत्सवावरच निर्बंध का?
- अजित पवार शिवजयंती उत्सवावरील निर्बंधांबाबत निर्णय घेणार का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
