🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी संसदेतील भाषणात देशात कोरोना स्प्रेडला महाराष्ट्र शासन आणि कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी तीव्र संताप व्यक्त करत मोदींनी राज्याची बदनामी केल्याचे म्हटले. यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असताना आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
महाराष्ट्राचा अपमानाचा मुद्दा संजय राऊत सारखे बोलत आहेत पण राऊत साहेब महाराष्ट्राची मान तेव्हाच खाली गेली जेव्हा राज्य सरकारच्या नाकर्त्यापणामुळे देशात सर्वाधिक कोराना बळी गेले. महाराष्ट्राचा अपमान तेव्हाच झाला जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर १०० कोटी खंडणीचे आरोप आयुक्तांनी केले.
आयुक्तांनी केले. राज्याचा अपमान तेव्हा होतो जेव्हा राज्यात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या.
राज्य सरकारच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांच भवितव्य अंधारात जात तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत असतो.
राज्य सरकार राज्यातील जनतेचा अपमान
2/3— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 10, 2022
तसेच राज्याचा अपमान तेव्हा होतो जेव्हा राज्यात गेल्या दोन वर्षात सर्वाधिक शेतकऱ्यांचा आत्महत्या झाल्या. राज्य सरकारच्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाते. तेव्हा महाराष्ट्राचा अपमान होत असतो. राज्य सरकारने सतत राज्यातील जनतेचा अपमान केला आहे. देशांतील एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात जनतेला कोणतेही पॅकेज दिले नाही. या बद्दल कधी बोलणार? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, कॉंग्रेसचा इशारा
- “काँग्रेसने तिकिटं काढून कामगारांना रेल्वेतून पाठवलं…”, पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र
- “जर मी भारतात जन्मलो असतो तर…”; एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
- IND vs WI: सलग १५ व्या वर्षी भारताचे विंडीजवर वर्चस्व कायम
- UP Assembly Election 2022 : पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
