🕒 1 min read
मुंबई : गानसम्राग्नी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवार दि. ६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लता दीदी आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्र्यांनी लतादीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
लता मंगेशकर यांचं मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात आज सकाळी ८.१२ वाजता निधन झालं. दुपारी १२.३० ते ३ वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं लता दीदींचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
