🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून भाजपला चांगलेच धारेवर धरले. भाजपने सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर केला. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करणे म्हणजे हिंदुत्व नाही. भाजपने आमच्याकडून गुलामांसारखे वागण्याची आस ठेवली. मात्र आम्ही झुकलो नाही. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. त्यामुळे आम्ही भाजप सोडला पण हिंदुत्व सोडणार नाही. भाजप हे हिंदुत्व नाही. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
“ना औरंगाबादचे संभाजीनगर झाले. ना उस्मानाबादचे धाराशिव झाले. साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात.” ,असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. दरम्यान हिंदुत्वावरूनच भाजप नेते राम कदम यांनीही शिवसेनेला डिवचले आहे.
ना औरंगाबादचे- संभाजीनगर
ना उस्मानाबादचे- धाराशिव
साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) January 24, 2022
“हिंदुत्वावर व्याख्यान देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे की, शिवसेना दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे अनुसरण करते का, ज्यांनी म्हटले होते की त्यांचा पक्ष राजकारणात आणि जीवनात कधीही काँग्रेसमध्ये सामील होणार नाही आणि अशी परिस्थिती उद्भवल्यास ते पक्षाला टाळे ठोकण्यास प्राधान्य देतील.” असे राम कदम (Ram Kadam) यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंसह सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रित करा
- पुतळे जाळायचे असतील तर ‘बेटी बचाव बेटी पटाव’ म्हणणाऱ्यांचे जाळा; नाना पटोलेंची भाजपवर टीका
- IND Vs SA : रवी शास्त्रींचा विराटला पाठींबा ; म्हणाले, “अजून दोन वर्ष…”
- ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांच्या गजरात औरंगाबादेत झाले छत्रपतींचे आगमन..!
- “…त्यामुळेच पटोलेंना महाराष्ट्राचे पप्पू म्हणून नामाभिमान देण्यात आलाय”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
