Share

“बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं…” ; सदाभाऊ खोतांनी घेतली फिरकी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गत दीड ते दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला (Maharashtra ST bus strike) आहे. राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४१ टक्के वाढ केली तरीही एसटी कर्मचारी संघटना संप मागे घेण्यास तयार नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सदाभाऊ खोत ट्विट करत म्हणाले, ‘बस सुरु नाही म्हणून पोरं पाच सहा किलोमीटर पायपीट करत आहेत. लांबच्या गावाच्यां मुलांची तर शाळाच बुडत आहे. बरं झालं असतं मुख्यमंत्र्यांसारखं घरी बसून मुलांनाही शिक्षण घेता आलं असतं. ‘ अशी टीका सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपूर्वीपासून एसटीचे विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संप पुकारला आहे. तो अद्यापही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना वेतनात ४१ टक्के वाढ दिली, विलीनीकरणासाठी समितीही नेमण्यात आली. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी लाखो प्रवाशांना वेठीस धरून संप सुरूच ठेवला आहे. संप मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन करुनही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. यामुळे विरोधकांतून राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!