🕒 1 min read
औरंगाबाद : जगभरात हिंदुस्थान हे विविधतेने नटलेले धर्मनिरपेक्ष राष्ट्र ओळखले जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक जाती धर्माचा आणि पंथाचा नागरिक जीवन जगू शकतो. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या गदारोळात बंधुभाव व सलोखा टिकून आहे. या चांगल्या भावनेतून व सामाजिक एकोप्यातून देशाची प्रगती होत असते, असे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant khaire) यांनी केले.
कतैया स्वामी जन्मोत्सवानिमित्त मालेगाव येथे बुरुड समाजाचा राज्यस्तरीय मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रत्येक समाजाने आपल्या जुन्या परंपरा व व्यवसाय कायम टिकून ठेवले आहे. यांत्रिकीकरणामुळे बारा बलुतेदार पध्दत कमी झाली आहे, हे खरं आहे. मात्र आजही अनेक पिढ्या नफा व फायदा न बघता आपला व्यवसाय कायम ठेवला आहे.
या गोष्टी पुढील पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले. यावेळी दादाजी भुसे यांनी शेती हा व्यवसाय आजही पूर्णपणे पारंपरिक अवजारे व साहित्य वापरून केला जातो. यामध्ये आधुनिकीकरण व जुन्या पध्दतीने सांगड प्रगतीचा मार्ग दाखवते. त्यामुळे प्रत्येक समाजाचे पेंटंट कामी येत आहे. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, कृषिमंत्री दादाजी भुसे, महापौर सखाराम घोडके, –आदींसह नागरिक उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
