Share

भारताचा विजय! न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने कसोटीसह जिंकली मालिका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली आहे. मुंबईत खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने पाहुण्या संघाचा विक्रमी ३७२ धावांनी पराभव केला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी (६ डिसेंबर) भारताने न्यूझीलंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत गुंडाळले. भारताचा कसोटी सामन्यातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी दिल्लीत (2015) त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 337 धावांनी पराभव केला होता.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने 325 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 62 धावांत बाद झाला. भारताने दुसरा डाव २७६/७ धावांवर घोषित करून न्यूझीलंडसमोर ५४० धावांचे डोंगरासारखे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 167 धावा करू शकला आणि फेब्रुवारी 2020 नंतर पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पराभूत झाला.

मुंबई कसोटी सामन्याचा चौथा दिवस जयंत यादवच्या नावावर होता. त्याने सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताला चार यश मिळवून दिले. तर रविचंद्रन अश्विनने एक यश मिळवून दिले. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 5 विकेट्सची गरज होती. जयंत यादवने विल समरविले, काईल जेम्सन, टीम साऊथी आणि रचिन रवींद्र यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जयंतच्या या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी पहिले सत्र संपण्यापूर्वीच न्यूझीलंडवर विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!