Share

जयसिंगपूरमध्ये होणार स्वाभिमानीची ऊस परिषद, एकरकमी एफआरपीसाठी राजू शेट्टी आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे वीसावी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलानाचं रणशिंग जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतून फुंकलं जातं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेची आतुरतेनं वाट पाहत असतात. राजू शेट्टी ऊस परिषदेत जी भूमिका मांडतील त्याआधारे स्वाभिमानीकडून आंदोलनाची पुढील दिशा ठरते. यंदा पहिल्यांदाच गाळप हंगामाआधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पावित्रा घेण्याचे संकेत आहेत.

तसेच जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्याने राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुनही राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली. या परिषदेतही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले जाते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!