Share

‘उद्यापासून ‘घट’ बसतील, पण मुख्यमंत्री कधी उठतील?’, शालिनी ठाकरेंचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे ठाकरे सरकार तसेच विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोपाचे सामने बघायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्रांचा प्रहार केला आहे.

शालिनी यांनी ट्विट करत खोचक सवाल केला आहे की,’उद्यापासून ‘घट’ बसतील पण गेलं दीड वर्ष घरातच ‘घट्ट’ बसून राहिलेले मुख्यमंत्री कधी उठतील?’ उद्यापासून देशभरात नवरात्र उत्सवाची सुरुवात होत आहे. याच पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करत सरकारने काही नियमावली जारी केली आहे. यालाच अनुसरून शालिनी यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ट्विट सोबतच त्यांनी महिला अत्याचार, ओला दुष्काळ आणि खड्डेमय रस्ते अशा हॅशटॅगचाही वापर केला आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून मुंबई, उपनगर आणि जवळील भागात असलेल्या खड्ड्यांवरून देखील नेते मंडळी आमने-सामने आले आहेत. शिवसेना या सगळ्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मुंबई महापालिकेचे प्रचंड बजेट जास्त असून देखील तेथील रस्त्यांची दुरावस्था कशी? असा सवालही केल्या जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!