उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून जिल्हावासीयांना सर्व अनुषंगिक व आर्थिक सहकार्य करावे, अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महसूल विभागाच्या कार्यप्रणालीनुसार ३० सप्टेंबरला हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ७३७ गावांमध्ये ही पैसेवारी ५० पैशांच्या आत केलेली आहे. खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसामुळे पडलेला खंड आणि काढणीच्या काळात झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे व शेतीचे अभूतपूर्व नुकसान झालेले आहे. काही मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नाही, म्हणून पंचनामे केले जात नाहीत अशा तक्रारी आल्या होत्या. जेथे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करणे अभिप्रेत आहे. तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महसूल आणि कृषी यंत्रणा सर्वत्र फिरलेली आहे.
नुकसानीची व्याप्ती त्यांना माहीत असल्याने अंतिम पैसेवारीची वाट न पाहता जिल्ह्यात राज्य शासनाने सरसकट अनुदान देणे नैतिकतेने बंधनकारक आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात तरी दिलासा मिळेल.असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राहुल गांधींना उत्तर प्रदेशात येण्याची परवानगी नाही, प्रियंका गांधींसह ११ जणांना अटक
- ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एनडीएत आलं पाहिजे’
- ‘टीम इंडिया स्पर्धा करण्यालायक नाही’, पाकिस्तानच्या माजी अष्टपैलूचं वक्त्यव्य चर्चेत
- लखीमपूर खीरीमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार; बच्चू कडू यांची घोषणा
- तालिबान आणि योगी सरकारमध्ये केवळ दाढीचा फरक, खासदार रजनी पाटील यांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
