🕒 1 min read
मुंबई : मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून पावसाने हाहाकार केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मराठवाड्याचा दौरा केला. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नुकसानीच्या पाहणीसाठी करण्यासाठी मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री या भागाचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने तसे कळवले आहे.
यावरून तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘मराठवाड्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे नदी-नाल्यांना महापूर आल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी बांधवांचे उभे पीक वाहून गेले असून शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचून जमिनीवर मोठमोठे खड्डे पडलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मदतीची घोषणा करावी, अशी मागणी राणा पाटील यांनी केली आहे.
‘शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना आधाराची गरज आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने तत्काळ मदतीची घोषणा करणे अपेक्षा आहे. अशावेळी फक्त गोड गोड बोलून आणि धीर सोडू नका, असे सांगून भागणार नाही. तर त्यांना थेट मदत मिळाली पाहिजे, अशी भूमिका घ्यायला हवी. शेतीमालाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी ही सगळी परिस्थिती गांभीर्याने घेऊन तात्काळ मदतीची घोषणा करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. त्यांनी आज मराठवाड्यातील पूरस्थितीबाबत बैठक घेऊन पूरग्रस्तांच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचावकार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू – संजय राऊत
- महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा तर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- ‘माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देश सोडून फरार?’, अजित पवारांनी दिले उत्तर
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

