🕒 1 min read
मुंबई: केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी कामगारां साठी जाहीर केली. मात्र आता याच ई- श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर करण्यात आले आहे. त्याचे ई-शिव आधार कार्ड योजना असे नामांतर करून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामीण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून ही योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र आता यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
भाजपचे अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘केंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर करण्यात आले असून शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या चाटायच्या आणि आपणच जेवणावळी घातल्या आहेत असा रुबाब दाखवायचा ही शिवसेनेची सवय आहे.’ असे खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या श्रमिक कार्ड योजनेचे शिवसेनेकडून नामांतर करण्यात आले असून शिव आधार नावाने ठाण्यात श्रमिकांच्या नोंदणीसाठी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
उष्ट्या खरकट्या पत्रावळ्या चाटायच्या आणि आपणच जेवणावळी घातल्या आहेत असा रुबाब दाखवायचा ही शिवसेनेची सवय आहे. pic.twitter.com/epikoR7isK— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 22, 2021
दरम्यान शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी या योजनेचा लाभ आपल्या माध्यमातून देण्यासाठी पुढाकार घेत या योजनेचे नाव शिव आधार केले आहे. या माध्यमातून नागरिकांची योजनेसाठी नोंदणी करण्याचे कार्य सुरु आहे. मात्र योजनेचे स्वरूप केंद्राचे असून नामांतर करून त्याचे श्रेय घेतले जात असल्याचा आरोप आता भाजपकडून केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा’
- ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून होता, आहे आणि असाच राहणार’
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- ‘नीट’ रद्द करण्याचा विचार नाही; सामंत यांचे स्पष्टीकरण
- चित्रा वाघ यांनी जाळले मुख्यमंत्र्यांचे पत्र; म्हणाल्या, हे पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

