Share

कंगनाचा अंधेरी कोर्टातील न्यायाधीशांवर आरोप; केली ‘ही’ मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  : प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. अंधेरी कोर्टात १४ सप्टेंबर रोजी कंगना न्यायालयात उपस्थित राहीली नव्हती. त्यावर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाली आहे. मात्र यावेळी न्यायालयावरच आरोप केल्याची माहिती समोर आली आहे.

कंगना कोर्टात आपली बाजु मांडताना सांगितलं की, माझा या कोर्टावरील विश्वास उडाला आहे. मला या कोर्टातून दुसऱ्या कोर्टात केस ट्रान्सफर करायची आहे. अंधेरी कोर्टाच्या न्यायाधीशांवर कंगनानं गंभीर आरोप केले आहेत. न्यायाधीश वारंवार कंगनाला कोर्टात का बोलावत आहेत. वॉरंट जारी करण्याची धमकी दोन वेळा दिली गेली.  तिचे वकील प्रत्येक सुनावणीला हजर होते. कंगना देखील याआधी कोर्टात आली होती. त्यामुळे तिला कोर्टात बोलवण्याची गरज का? या न्यायाधीशांवर विश्वास नाही, त्यांना बदलण्याची मागणी कंगनानं वकिलांमार्फत केली आहे.

दरम्यान, कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अंधेरी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!