🕒 1 min read
नांदेड : आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी सुरू असलेल्या विमा कंपनीच्या पंचनाम्यादरम्यान, कृषी अधिकारीही उपस्थित असावेत असे निवेदन आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी कृषी अधिकारी उपस्थित नसून विमा कंपनीचे प्रतिनिधी एकट्यानेच पंचनामे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचानामे करु देऊ नका असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.
मागील काही दिवसात जिल्हा आणि परिसरामध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचानामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, विमा कंपनीचे अधिकारी पंचनामे करण्यासाठी पोहोचत नसून योग्य पंचनामे होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे जो पर्यंत कृषी अधिकारी सोबत घेत नाहीत, तो पर्यंत पंचनामे करु नये अशी मागणी आमदार पवार यांनी केली होती.
त्यामुळे शेतकऱ्यांनीच आता कृषी अधिकारी असेल तरच पंनमाने करु द्यावी, अशी भूमीका घ्यावी असे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे. इतकेच नाही तर हा प्रकार कोणत्याही शेतकऱ्यास आढळून आल्यास त्वरित आपल्याशी, जिल्हाधिकाऱ्यांशी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संवाद साधावा असे आवाहन देखील आमदार राजेश पवार यांनी शेतकरी बांधवाना केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
