Share

आता पेट्रोलची दुसरी सेंच्युरी करण्यासाठी भाजप जनतेचा आशिर्वाद मागत असेल – नाना पटोले

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त केंद्रीय मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेस निघाले आहेत. त्यांच्या या यात्रेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी लक्ष्य केलं असून आज पुण्यात पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपच्या या यात्रेवर निशाणा साधलाय.

‘देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष देण्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही. पेट्रोल डिझेलने सेंच्युरी पार केली असून आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जनतेचा आशिर्वाद मागत असावेत,’ असा टोला लगावत पटोलेंनी जन आशीर्वाद यात्रेचा समाचार घेतला.

यासोबतच, ‘या यात्रेदरम्यान भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल,’ अशी टीका देखील नाना पटोले यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!