🕒 1 min read
मुंबई: शाळा सुरू न झाल्याने बालभारतीने छापलेली लाखो शालेय पुस्तके धुळीत पडून आहेत. आता ही पुस्तके रद्दीत देण्यासाठी बालभारतीने टेंडर काढले आहेत. यादरम्यान ४२६ मेट्रीक टन पुस्तके रद्दीत विक्रीसाठी काढले जाणार आहेत. पेपर मिल्सने याबाबत टेंडर मागविले आहे. बालभारतीच्या एकूण नऊ गोदामांमध्ये पुस्तके पडून आहेत. पुणे, गोरेगाव, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि पनवेल या भागात ही पुस्तके रद्दीत जमा झाली आहेत.
साधारण मार्च २०२० पासून कोरोनामुळे राज्यातील शाळा बंद आहेत. यादरम्यान शाळा बंद असूनही बालभारतीने लाखो शालेय पुस्तके छापली. मात्र ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यातच आलीच नाहीत. त्यामुळे बालभारतीने हा निर्णय घेतला असल्याचे कळते आहे.
दरम्यान ठाकरे सरकारने १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा उघडणार असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. यामुळे बालभारतीकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्याकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे लाखोंचे नुकसान तर झालेच शिवाय नवीन पुस्तके रद्दीत जमा झाली.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘नाचता येईना अंगण वाकडे’ ही महाविकास आघाडी सरकारची सद्यस्थिती-बावनकुळे
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
