Share

फर्दापूर-सावळदबारात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली पीक पाहणी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पावसा अभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करा असे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागास दिले. सोयगाव तालुक्यात जवळपास १५ ते २० दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने तालुक्यातील शेतक-यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहेत. पावसा अभावी मका पीक करपत असून सोयाबीनची पाने-फुले गळत असल्याचे चित्र आहे.

तसेच पावसाअभावी तालुक्यातील कापूस, तूर इत्यादी सर्वच पिके धोक्यात आली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव तालुक्यातील फर्दापुर व सावळदबारा सर्कलचा दौरा करून जंगला तांडा, जामठी, घाणेगाव, नंदा आदी ठिकाणी जावून येथील पिकांची पाहणी केली. त्यासोबतच येथील काही शेतक-यांशी संवाद साधून राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतक-यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी पावसा अभावी नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून तालुक्यातील पिकांचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसुल तसेच कृषी विभागास दिले.

यावेळी जि.प.बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, तहसीलदार रमेश जसवंत, शहर प्रमुख संतोष बोडखे, उस्मान पठाण, तालुका उपप्रमख गुलाबराव कोलते, मा.सभापती धरमसिंग चव्हाण, बाबू चव्हाण, शिवाप्पा चोपडे, दारासिंग चव्हाण, रविंद्र बावस्कर, रशीद पठाण, विलास वराडे, सिताराम जाधव, गणेश खैरे, राधेश्याम जाधव, बाळू पाटील, सुरेश चव्हाण, हिरा चव्हाण आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!