🕒 1 min read
वायनाड : काँग्रेस नेते राहुल गांधी १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान केरळमधील वायनाड या त्यांच्या संसदीय मतदारसंघाच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर गेलेले असतांना पहिल्या दिवशी त्यांनी मंथवडी येथील गांधी पार्क मधील महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी राहुल यांनी मोदी सरकारला चांगलाच टोला लगावला.
ते म्हणाले की, ‘आज आपल्याकडे अनेक लोक आहेत, जे म्हणतात की त्यांना न्याय्य देश हवा आहे आणि तेच इतरांशी अन्यायकारक वागतात. ते म्हणतात की त्यांना असा भारत हवा आहे जो महिलांचा आदर करेल आणि मग ते स्वतः महिलांचा अनादर करतात. ते म्हणतात की त्यांना धर्मनिरपेक्ष राष्ट्र हवे आहे, पण ते स्वतः धर्मांना वेगळ्या दृष्टीने पाहतात.
Rahul Gandhi arrives in Kerala on 3-day visit to his parliamentary constituency Wayanad
He'll unveil Mahatma Gandhi's statue at Gandhi Park in Mananthavady today. On Aug17, he'll meet Kalpetta District Collector followed by inauguration of Karassery Panchayat Farmers' Day prog pic.twitter.com/bmFfA5i9BI
— ANI (@ANI) August 16, 2021
पुढे ते म्हणाले की, ‘महात्मा गांधींची सर्वात शक्तीशाली गोष्ट ही होती की, त्यांनी जे काही सांगितले, त्याला आचरणातही आणले. त्यामुळेच जर त्यांनी म्हटलं की भारत सहिष्णू देश झाला पाहिजे तर ते सहिष्णूपणे वागले. जर त्यांनी म्हटले की भारताने महिलांचा सन्मान केला पाहिजे, तर ते देखील महिलांशी सन्मानानेच वागले.’
The powerful thing about Mahatma Gandhi was that whatever he said, he put into action. So if he said India should be a tolerant country then he behaved in a tolerant way. If he said India should treat its women with respect, he treated women with respect:Rahul Gandhi, Cong leader pic.twitter.com/k03KMEXEhz
— ANI (@ANI) August 16, 2021
दरम्यान, राहुल हे त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या ३ दिवसांच्या दौऱ्यावर असून १७ ऑगस्ट रोजी ते कालपेट्टाच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट आहेत. तसेच त्यानंतर ते कारसेरी पंचायत शेतकरी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन असून कारसेरी बँक सभागृह, नॉर्थ कारसे, तिरुवम्बादी येथे शेतकऱ्यांचा सत्कार करतील. त्यानंतर, ते मलप्पुरम येथील वंदूर येथील गांधी भवन स्नेहाराम वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत दुपारचे जेवण करतील.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन मुलांनी तानाजी मालुसरे बनले पाहिजे’
- छत्रपती शिवरायांबद्दल जेवढे तुम्ही वाचले नसेल, तेवढे मी ५० वर्षांपूर्वी वाचलेय–राज्यपाल कोश्यारी
- राहुल गांधींची तरुणाई! वायनाडमध्ये युवतींसोबत केले स्नेहभोजन
- राष्ट्रवादीच्या मेहबूब शेख यांची ‘धूम!’ नियमांची ऐशीतैशी करत ठाकरे सरकारला दाखवला ठेंगा
- ‘त्या’ घोषणेमुळे पंकजा मुंडे यांना राग अनावर, त्यांच्याच समर्थकांना म्हणाल्या, ‘मुर्ख कुठले!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
