Share

‘साडेतीनशे वर्षांपूर्वी गाथेत लिहिलेले आता २०२१ मध्ये खरे होत आहे’

Published On: 

बीड : आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. ही तिसरी लाट, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी किंवा तरुणांसाठी नसून, ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत जनतेला लुटले त्यांच्यासाठी आलेली असून जे बांधव घरावर तुळशीपत्र ठेवून आठ महिने ऊस तोडण्यासाठी बाहेर जातो त्याला कोरोना शिवला नाही. ही ईश्वरी ताकद असून देव आहेच हे आपल्याला मान्यच करावे लागणार आहे असे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.

आष्टी येथे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाकाळात उकृष्ट काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर बोलत होते. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. इंदुरीकर महाराज म्हणाले, जन्माला आलेल्या प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. कोरोनाकाळात डाॅक्टर, पोलिस व समाजिक संस्था हेच खरे कोरोना योद्धे आहेत. ज्यांनी कोरोनात एक तरी पेशंट वाचवला तर त्यांना काशी, देवधर्म करायची गरज नाही.

साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी गाथेत लिहिलेले आता २०२१ मध्ये खरे होत आहे. कोरोनाने कुणालाच सोडले नाही. सध्या सृष्टीवर असलेले आजार दूर करण्यासाठी झाडे लावा, नदी वाचेल, नदी वाचली तर सगळेच वाचतील आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. त्यामुळे सर्वांनी एक तरी झाड लावा आणि जगावरचे संकट दूर करा असा उपदेश इंदुरीकर महाराज यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!