🕒 1 min read
मुंबई : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री या भागाचा दौरा करत आहेत. मात्र, राज्य सरकारच्या वतीने अजूनही ठोस आर्थिक मदत या पूरग्रस्त भाागातील नागरिकांना देण्यात आलेली नाही. यावरुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यात येत आहे.
या संदर्भात टीका करताना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांची खोचक प्रश्न विचारला आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, ‘राज्य सरकार फक्त पाहणीचं करतयं… पुरग्रस्तांना मदत करणार आहात कि नाही? का फक्त पाहणीवरचं भागवायचं?’
राज्य सरकार फक्त पाहणीचं करतयं… पुरग्रस्तांना मदत करणार आहात कि नाही? का फक्त पाहणीवरचं भागवायचं?@CMOMaharashtra @OfficeofUT
— Uma Khapre( Modi Ka Parivar) (@umakhaprebjp) July 30, 2021
पूरग्रस्तांना मदत करण्याचे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात येत आहे. वास्तविक अद्याप कोणतीच ठोस आर्थिक मदत पूरग्रस्तांना देण्यात आलेली नाही. मात्र, सर्वच नेते या भागाचे दौरे करून पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहे. यावरुन आधी प्रत्यक्ष मदत करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पदार्पण करताच पडिक्कलचा खास विक्रम ; ठरला पहिलाचं भारतीय फलंदाज
- मंत्रिमंडळ बैठकीतच अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्री जयंत पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- राजेंद्र जंजाळ यांच्यावर खोटे आरोप लावणे ‘भाजप’ने बंद करावे, अन्यथा प्रत्युत्तर देण्यास युवासेना तयार!
- ‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटूंबांची मुस्कटदाबी अन् दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास…’
- पूरग्रस्तांना मदत कधी? प्रश्नाला उत्तर न देता जाणाऱ्या मंत्री राऊत यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

