मुंबई : भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान पाच कसोटी सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र या मालिकेपुर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गील जखमी झाल्यामुळे तो भारतात परतला आहे.
मात्र अद्यापही बीसीसीआयच्या संघ व्यवस्थापनाने गीलच्या जागी बदली खेळाडूची निवड केलेली नाही. यासंदर्भात बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीला प्रश्न विचारला असता. हा निर्णय संपुर्णपणे संघ व्यवस्थापन आणि निवड समिती घेत असते. आपण त्यात लुडबूड करत नाही असे स्पष्ट केले आहे. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या संघात गीलच्या जागी सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडिक्कलची मागणी केली होती. मात्र निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी याबद्दल कोणताच निर्णय घेतला नाही.
जर निवड समितीने बदली खेळाडू नाही पाठवला तर रोहित शर्मासोबत मंयक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांचा पर्याय उपलब्ध आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला असुन यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरनाची लागण झाली आहे. तसेच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ही आगामी जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा भाग असल्याने महत्वाची मालिका मानली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ऐश्वर्या बच्चन इन्स्टाग्रामवर केवळ ‘या’ एका व्यक्तीला करते फॉलो
- ‘पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच’; शिवसेनेकडून पुन्हा ऑफर ?
- श्रीलंकेविरुद्ध धवनला ‘हे’ विक्रम करण्याची नामी संधी
- पहिल्या वनडेमध्ये अशी असणार खेळपट्टी ; फलंदाजांना होऊ शकतो फायदा
- ‘पवारांच्या आशीर्वादाने ठाकरे मुख्यमंत्रीपदी, मग राष्ट्रवादी कोणामुळे सत्तेत ?’; शिवसेनेचा राष्ट्रवादीला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
