सिंधुदुर्ग : आज भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनावरून देखील महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. ‘शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?’ असं म्हणत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
‘राज्यात कोरोनामुळे एक लाख तीस हजार लोकांचा मृत्यू झाला. त्याची चर्चा होत नाही. मुख्यमंत्र्यांना त्याचं गांभीर्य नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाहीत. पत्रकार परिषद घेत नाही. अधिवेशनही अल्पकालावधीचं घेतात. शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?,’ असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.
यासोबतच, महाराष्ट्रातले जटील प्रश्न आहेत. गंभीर प्रश्न असताना सरकार दोन दिवसांचं अधिवेशन घेऊन पळ काढत आहे. अधिवेशनाच्या आधी मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत असतात. ते मात्र पळून गेले. त्यांना कोणतंही गांभीर्य नाही. त्यामुळेच दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे. एका बाजुला स्वत:ला वाघ म्हणवून घ्यायचं आणि दुसरीकडे कोल्ह्यासारखा पळ काढायचा, अशी टीका देखील नारायण राणे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणूनच १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले’; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
- ओबीसी आरक्षणासाठी १२ काय १०६ आमदार पणाला लावू; देवेंद्र फडणवीसांची गर्जना
- ‘राष्ट्रवादीचा बहुरूपी सांता क्लॉज मोदींवर खोटे आरोप करत होता’; भाजप नेत्याची खोचक टीका
- पुणेकरांना दिलासा : आज नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट
- ठाकरे सरकारचं ठरलं ; ग्रामीण भागात ८ वी ते १२ वीचे वर्ग भरणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
