Share

‘जुलाई आ गया है, वैक्सीन नहीं आयीं’, राहुल गांधींचा मोदी सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचं संकट कायम आहे. संसर्गाचा वेग जरी कमी झालेला असला, तरी देखील अद्यापही नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. दुसरीकडे देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेस अधिक गती देण्याची गरज आहे.

कोरोना लसीवरून राजकीय वातावरण तापले आहे. कोरोना लसीसंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘जुलै आला, लस आली नाही’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लसीवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

देशातील प्रत्येक नागरिकास लवकरात लवकर कोरोना लस देण्यात यावी, जेणेकरून येणाऱ्या कोरोना संकटापासून लोकांना वाचविता येईल, असे आवाहन राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला केले आहे.

दरम्यान, भारत सरकारने जागतिक योगदिनापासून ७५ टक्के लसी राज्यांना मोफत देण्यास सुरवात कली. त्यावेळेपासून लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. जून महिन्यात राज्यांना केंद्राकडून ११ कोटी ५० लाख लसी दिल्या गेल्या. या महिन्यात ही संख्या वाढवून किमान १२ कोटी लसी देण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. जर विरोधी नेत्यांना यातील वस्तुस्थिती माहिती असेल व तरीही ते बेजबाबदार टीका करत असतील तर ते दुर्दैवी आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी कालच सांगितले होते. तरीही आज परत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!