Share

डब्लुटीसीच्या फायनलमध्ये ‘या’ कारणामुळे न्युझीलंड भारतीय संघाला भारी पडु शकतो: दिलीप वेगंसकर

Published On: 

मुंबई : आयपीएल स्थगीतीनंतर काही दिवसातच बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघाला जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

इंग्लंडमध्ये भारतीय संघाला न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसकर यांनी मत मांडताना न्युझीलंडचा संघ वरचढ ठरेल असे सांगीतले आहे. कारण भारताविरुद्धच्या सामन्याआधी न्युझीलंडचा संघ इंग्लंडसोबत दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. यानंतर ते भारताविरुद्ध डब्लूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळतील. यामुळे त्यांच्यासाठी इंग्लंडमध्ये सामना खेळण्याचा पुरेसा अनुभव असणार आहे. मात्र भारतीय संघाला सरळ न्युझीलंड विरुद्ध डब्लुटीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले. डब्लुटीसी स्पर्धेचा अंतिम सामना हा भारतासाठी इंग्लंड दौऱ्यातील पहिला सामना असणार आहे. तर न्युझीलंड संघासाठी तिसरा सामना असणार आहे. त्यामुळे न्युझीलंडच्या संघाला तेथील वातावरणाचा पुरेसा अनुभव आलेला असल्याने तो संघ भारताला वरचढ ठरु शकतो. भारतीय संघ इंग्लंडमध्ये १८ ते २२ जुन दरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. यानंतर इंग्लंडसंघासोबत ५ कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!