Share

गंभीर! दावा ३० कोटी लसीकरणाचा, प्रत्यक्षात मात्र ४ कोटी नागरिकांना मिळाली लस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : काँग्रेस नेते तथा खासदार जयराम रमेश यांनी लसीकरण मोहिमेवरून केंद्राला लक्ष्य करत सरकारचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीत तफावत असल्याचा आरोप केला. जानेवारीत सरकारने दावा केला होती की, जुलै अखेरपर्यंत ३० कोटी लोकांचे लसीकरण झालेले असेल. प्रत्यक्षात २२ मे पर्यत अवघ्या ४.१ कोटी लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत.

२१ मे रोजी सरकारने दावा केला की, चालू वर्षाच्या अखेरिसपर्यंत देशातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण झालेले असेल. प्रत्यक्षात या दिवशी देशात फक्त १४ लाख लोकांना लस देण्यात आली, असे ट्विट रमेश यांनी केले. लसीकरणाबाबतचे सरकारी दावे आणि आकडेवारीतील हा फरक दाखवत ‘देशाला लस हवी मगरीचे अश्रू नकोत,’ असा घणाघाती टोला जयराम रमेश यांनी मोदींना लगावला.

दरम्यान, देशातील ‘ब्लॅक फंगस’च्या वाढत्या उद्रेकामुळे काँग्रेसने केंद्राला धारेवर धरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी मोदी सरकारच्या कुशासनाला जबाबदार धरले आहे, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ब्लॅक फंगसच्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!