Share

सिल्लोड तालुक्यात पाणीसाठा वाढवण्याच्या, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सूचना!

Published On: 

🕒 1 min read

सिल्लोड : सिल्लोड तालुक्यात पाणीसाठा वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सिंचन बळकटीकरणासाठी तातडीने काम करा असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बैठकीत दिले. या निर्देशानुसार पर्यायी पाणीसाठ्याचे प्रकल्प अहवाल सादर केले जाणार आहेत. सिंचन भवन येथे गुरुवारी सिल्लोड तालुक्यातील जलसिंचन आढावा बैठक झाली. सिल्लोड तालुक्यात क्षेत्रफळानुसार हक्काचे पाणी तालुक्यास मिळणे आवश्यक आहे. वेळेत नियोजन केल्यास पावसाळ्यात पाण्याचा योग्य साठा होईल.

शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था निर्माण करायची आहे. सिल्लोड-सोयगाव तालुक्याचे सर्वेक्षण करून संबंधितांनी पर्यायी पाणीसाठ्याचे प्रकल्प अहवाल सादर करावेत. ज्या माध्यमातून शासनाकडे तालुक्यासाठी पर्यायी पाणीसाठ्याची मागणी करता येईल. तसेच मान्यता मिळालेल्या, मात्र काम सुरु न झालेल्या, मान्यता रद्द झालेल्या इतर धरण प्रकल्पातील तसेच इतर पाणीसाठ्यात मधील पाणी जलसिंचनासाठी वापरण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असे म्हणाले.

या प्रकल्पाची उंची वाढविण्याचा प्रलंबित प्रस्तावाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश सत्तार यांनी यावेळी दिले. मध्यम प्रकल्पाच्या धरण पाणीसाठ्याच्या जमिनीची मोजणी करून सीमा निश्चिती करणे, अतिक्रमण हटवून जागा ताब्यात घ्यावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता डी. बी. तवार, अधीक्षक अभियंता मनोज अवलगावकर यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!