Share

मोदी साहेब, बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? राष्ट्रवादीच्या चव्हाणांचा मोदींना सवाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना संकट काळात आधीच शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळत नसल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. त्यात खतांच्या किमतीत ५०० ते ७०० रुपयांनी वाढ करून केंद्र सरकारने त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मोदी साहेब, खतांच्या किमती वाढल्यामुळे बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? याचा आता तुम्हीच विचार करा. असा सवाल औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आ. सतिश चव्हाण यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे.

पावसाळा तोंडावर आला आहे. शेतकरी वर्ग मशागतीच्या कामाला लागला आहे. पण केंद्र सरकारने खतांच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. एकीकडे शेतमालाच्या किंमती घसरल्या असतांना खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खतांच्या किमतीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. असे असतांना देशातील शेतकरी संघटना मात्र मूग गिळून गप्प का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते. इथे तर त्यांनी खतांचेच दर दुप्पट केलेत. मोठा गाजावाजा करून ‘पीएम किसान’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार जमा करायचे अन खतांचे दर वाढवून ते परत काढून घ्यायचे. ही कसली ‘पीएम किसान योजना’? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोदी साहेब, खतांच्या किमती वाढल्यामुळे बळीराजाने पेरायचे काय आणि खायचे काय? याचा आता तुम्हीच विचार करा. म्हणत केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!