🕒 1 min read
कोल्हापूर : अरबी समुद्रातील तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. हे चक्रीवादळ आज महाराष्ट्राच्या किनारपट्टीभागातून पुढे जात आहे.
यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. कोल्हापुरात अनेक तालुक्यांमध्ये मुसलदार पाऊस सुरु असून आज दिवसभरात अनेक ठिकाणी वाहने, घरे, शाळा, शासकीय कार्यालयं यांवर झाडे पडण्यासह छत उडून गेल्याने लाखोंचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आजरा, चंदगड, हातकणंगले, भुदरगड, करवीर, शाहूवाडी या तालुक्यांमध्ये घरांची, शाळांची पडझड होऊन वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
Kolhapur
वादळी वाऱ्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन स्फोट,कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातील घटना,झाडाच्या फांदीचा विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने घटना#CycloneTauktaeupdate pic.twitter.com/NgBLBYUJs2— Narendra Bandabe (@narendrabandabe) May 16, 2021
कोल्हापूर शहरात देखील विद्युतवाहिनी तारांवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांचे घर्षण झाल्याने स्फोट होऊ लाईट जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत असल्याने या वादळाचा परिणाम आणखी एक दिवस राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर ‘कोव्हॅक्सीन’ लस प्रभावी : भारत बायोटेक
- …म्हणून पुण्यात उद्या लसीकरण नाही ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती !
- कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी कधी लसीकरण करून घ्यावे ? घ्या जाणून !
- रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल
- ‘महाराष्ट्राची प्रगती पचत नाही म्हणूनच फडणवीस असे उद्योग करतायत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
