Share

‘अजित पवारांमुळे पुण्याची आर्थिक स्थिती इतकी बिकट की पुढील पुढील दहा वर्षे…’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

दरम्यान, पुण्यात वेळीच लॉकडाऊन झाला म्हणूनच रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे आता केंद्र सरकारचे अधिकारीच सांगत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. आज जिल्हा आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, ‘पुण्यात लॉकडाऊन केला म्हणून रुग्णसंख्या आटोक्यात आली, असं केंद्र सरकारचे अधिकारीच सांगतात. पण लॉकडाऊन करताना किती त्रास झाला, हे आम्हालाच माहित. त्यामुळे लोकांनी जरा सबुरीने घ्यावं.’

आता अजित पवारांच्या या दाव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे. ‘अजित पवारांना हे बरं जमतं स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. पुण्याची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की दहा वर्ष उठणार नाही. लोकांनी विचार करावा या मंडळींचे साखर कारखाने सॅनिटायझर बनवायचं कारण देऊन चालू राहिले, अख्या लॉकडाऊन मध्ये साखर कारखाने एकही दिवस बंद नाही,’ असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!