मुंबई : सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचे संकट आहे. अशा काळात रुग्णांचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांकडून डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेय.
या अनुषंगाने कोरोनासारख्या संकटकाळात आणि अत्यंत तणावाच्या परिस्थितीत अविरत सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. सुरक्षेत कुचराई होत असल्यास ते सरकारचे अपयश आहे, अशी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांच्या पोलिसात दाखल गुन्ह्यांचा अहवाल न्यायालयाने मागवला आहे.
डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले असून या न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका डॉ.राजीव जोशी यांनी दाखल केली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांना प्रतिबंध करणाऱ्या सन २०१० च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका या याचिकेत ठेवण्यात आला आहे. यावेळी राज्यभरात हल्ल्यांचे किती एफआयआर दाखल झाले ते न्यायालयासमोर सादर करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- राशीद खान दुबईत करतोय मजा, ‘ही’ महिला क्रिकेटर म्हणते…
- मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर कारवाई करणारे रेमडेसीविर चोरांबाबत बोटचेपी भूमिका का घेत आहेत ?
- पहिल्याच दिवशी राधेचा धमाका ; दुबईत थिएटरबाहेर रांगा, तर…
- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आज मिळणार पीएम किसान योजनेचा आठवा हप्ता…
- कोरोना वरील विजयाचा दिवस हाच साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस असेल – धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

