Share

जालन्यात मैत्रीच्या नात्यावर काळीमा; किरकोळ कारणावरुण मित्रानेच केला मित्राचा खून!

Published On: 

🕒 1 min read

जालना: शहरात धक्कादायक प्रकार घडला आहे, शहरातील गांधी नगर भागांमध्ये रात्री आठच्या सुमारास मित्राने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या मित्राच्या पोटात चाकूने सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरील घटनेने परिसरामध्ये खळबळ माजली आहे. संतोष शिवलाल वाघाडे, असे आरोपीचे नाव असून त्याने मित्र श्याम गणपत थोरवे याच्या पोटामध्ये चाकूचे वार केले, यामध्ये श्यामचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

आठ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरुन दोघांचे भांडण झाले होते. परंतु संतोषने रागाच्या भरातून चाकू काढला असता श्याम घाबरला, त्यावेळी त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. या भांडणातून मंगळवारी वाघाडे याने श्यामवर चाकूने हल्ला केला. श्यामच्या मावस भावाने त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी ही भेट दिली. श्याम गणपत थोरवे यांचा मावस भाऊ अमोल देविदास पवार ज्याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादु्र्भाव वाढत आहे तर दुसरीकडे शहरात गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करावी असे नागरिकांचे मत आहे तसेच या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. असून पुढील तपास चालू आहे. आरोपी पोलीसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती उप विभागिय पोलिस आधिकारी सुधीर खिरडकर यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!