🕒 1 min read
औरंगाबाद: जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कडक संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता त्याला स्थानिक प्रशासन आवश्यक ते सर्व उपाययोजना करत आहे. त्याच सोबत शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून विनामास्क विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या निर्देशानुसार १ एप्रिल ते ११ मे पर्यंत जिल्हात कोविड-१९ च्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कलम १८८ भादंवी प्रमाणे ३७७ गुन्हे दाखल करण्यात आले असुन विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांविरूध्द नगरपरिषद, ग्रामपंचाय यांच्या संयुक्त कारवाईत ४ हजार ४३६ नागरिकांकडून ४ लाख १२ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला, तर नियमांचे उल्लंघन करून आस्थापना (दुकाने) उघडी ठेवणारे २३४ दुकानदारांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संचारबंदीचे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या १० हजार ६४३ वाहनधारकांवर मोटर वाहन कायद्यान्वये २३ लाख ६७ हजार ३५० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच ११ मे रोजी नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडी ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करत गंगापुर पोलीस ठाणे अंतर्गत आंबेडकर चौक व राजीवगांधी चौकातील उघडी असलेली ६ दुकाने सिल करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिल्लेगाव पोलीस ठाणे येथील ७ दुकानांवर कारवाई करत २ हजार १०० रुपये दंड आकारण्यात आला तसेच वैजापुर येथील तीन दुकानांवर कारवाई करत ३ हजार रुपये दंड तसेच पाचोड, फुलंब्री, कन्नड, पैठण असे एकुण २३ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. तर भादंवी १८८ प्रमाणे ८ गुन्हे दाखल करण्यात आले असुन संचारबंदी चे उल्लंघन करून विनाकारण फिरणाऱ्या २०९ वाहनधारंकावर ४६ हजार ६०० रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरिकांनी सार्वजनिक स्तरावर एकत्रित जमा होऊन गर्दी करणे तसेच अत्यावश्यक वस्तु खरेदी करतांना एकमेंकाच्या अधिक संपर्कात येणे, अशा बाबी कटाक्षाने टाळून सर्वांनी त्रिसुत्री कार्यक्रम ज्यात मास्कचा वापर अनिवार्य, सॅनिटाईझर/साबनाने हात वारंवार स्वच्छ धुणे, फिजिकल डिस्टसिंग ठेवणे या बाबींचा सर्वांनी दैनंदिन जिवनात काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. या नियमांचे जाणीवपुर्वक उल्लघंन करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्था यांची गय केली जाणार नाही त्यांच्या विरूध्द कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून मला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम केलं जातंय; देशमुखांचा गंभीर आरोप
- कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका पाहता बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स – यशोमती ठाकूर
- औरंगाबादकरांनो सावधान! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल होतोय गुन्हा
- मराठवाडा मॅथमॅटिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.ज्ञानोबा धायगुडे यांचे निधन
- ‘अहो नड्डा, मोदींनी देशाला बनवलंय मृत्युंचा अड्डा’, सचिन सावंताचे शायरीतून टोले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

