Share

‘सोलापूरचे पाणी पळवणारे भरणे हे चोर आहेत आणि अजित पवार हे दरोडेखोर आहेत’

Published On: 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पाणी प्रश्न पेटला आहे. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळविण्याच्या निर्णायावरुन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरकरांमध्ये चांगलाच वाद पेटला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थित पुण्यातील सिंचनभवनात दत्तात्रय भरणे आणि सोलापूरमधील शिष्ट मंडळ यांच्यात बैठक काल झाली.

दरम्यान,यावेळी बोलताना भरणे म्हणाले, एक ठिपका पाणीही सोलापूरचं घेणार नाही, मात्र इंदापूरला ही पाणी कमी पडू देणार नाही. सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचा राजीनामा देईल अशी भूमीका भरणे यांनी घेतलीय.यावेळी बोलतांना भरणे यांनी या सगळ्या बाबत गैरसमज झाला असून तो दूर करण्यासाठी ही बैठक असून यामध्ये राजकारण होत असल्याचा आरोप भरणे यांनी केलाय.

दरम्यान, सिंचन भवनमध्ये झालेल्या बैठकीत दत्तात्रेय भरणे यांनी जे सांगितले आहे, ते पूर्णपणे खोटे आहे. पालकमंत्री भरणे हे चोर आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दरोडेखोर आहेत. आमचं (सोलापूरच्या हिश्याचं) पाणी चोरलंय आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे गोलमाल दिली जात आहेत, त्यामुळे यापुढचं आंदोलन आम्ही गोविंद बागेत करू, असा इशारा उजनी धरण पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!