🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा
स्थगित करण्यात आली आहे.
आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करणार आहे.
नुकताच विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अनुष्का आणि विराट दोघेजण दिसत आहेत. या व्हिडीओद्वारे अनुष्का आणि विराट म्हणाले, ‘कोविड १९चा उद्रेक झाल्यापासून आपला देश कठीण काळातून जात आहे. आपल्या आरोग्य व्यवस्थांना आव्हान दिले जात आहे. आपल्याला एकत्र येऊन आपल्या भारताला मदत करण्याची गरज आहे.
कोविड १९ रिलीफ मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी अनुष्काने आणि मी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली आहे. आणि आम्ही तुमच्या समर्थनाबद्दल आभारी आहोत. जीव वाचवण्यासाठी कोणतीही रक्कम फारच कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. मी तुम्हा सर्वांना आमच्या चळवळीत सहभागी होण्याची विनंती करतो. चला आपला देश सुरक्षित आणि मजबूत ठेवण्यासाठी आपली भूमिका करू.धन्यवाद.’ असे म्हणत विराट आणि अनुष्काने या कॅम्पमध्ये सहभागी होण्याचे सर्वाना आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- संगमनेरमध्ये पोलिसांना पाठलाग करुन मारहाण, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड
- ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणाची योग्य बाजू मांडली नसल्याने मराठा समाजावर अन्याय झाला’
- ‘बंगालमध्ये सर्वांना तत्काळ मोफत लस द्या’, ममतांचे पंतप्रधान मोदींना पत्र
- ‘पश्चिम बंगालमध्ये अराजकता, राष्ट्रपती राजवट लागू करा’, गिरीश महाजनांची मागणी
- धक्कादायक! पश्चिम बंगालमध्ये ममता समर्थकांकडून केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
