Share

मराठा आरक्षण निकाल हा महाविकास आघाडीच्या दुर्लक्षाचा परिणाम-रावसाहेब दानवे यांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

जालना : मराठा आरक्षणाचा सर्वोच्च न्यायालयात बचाव करण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पूर्ण अपयश आले आहे. मराठा समाजात या निर्णयामुळे एक प्रकारचा आक्रोश निर्माण झाला असून त्यास फक्त महाविकास आघाडीचे सरकार जवाबदार आहे. आजचा निकाल हा महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या मुद्यांवरुन सतत होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम असल्याचे मत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.

या संबंधी दानवे यांनी प्रसिद्ध पत्रक काढले असून यामध्ये म्हटले की, ‘गेल्या वर्षी याच गंभीरतेच्या अभावामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती आणि आता तर आरक्षण रद्दच झाले आहे. मराठा आरक्षण न्यायालयात टिकविण्यासाठी राज्य सरकारमध्ये समन्वय नव्हता. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते.’

इंदिरा साहनी निकालातील असाधारण परिस्थिती या मुद्याचा आधार घेऊन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवले होते. बत्तीस टक्के समाज मागास ठरतो त्यावेळी असाधारण परिस्थिती म्हणून पन्नास टक्कांची मर्यादी ओलांडावी लागते. हे फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला यशस्वीरित्या पटवून दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

परंतु, नेमका हाच मुद्दा महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयासमोर प्रभावीपणे मांडू शकले नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण गमवावे लागले. या विषयी गांभीर्याने आघाडी सरकारने योग्य समन्वय साधून काम केले असते तर आज परिस्थिती वेगळी असती. तसेच हा विषय राज्य सरकारचा आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जवाबदारी राज्य सरकारने ढकलू नये, असेही दानवे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!