Share

‘स्वत:चे अपयश झाकण्यासाठी ठाकरे सरकारची केंद्रावर टीका’

Published On: 

अहमदनगर : महाराष्ट्राला केंद्राने लसींचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. आपले अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार केंद्रावर टीका करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

केंद्राकडून राज्य सरकारवर अन्याय होत असल्याचा आरोप होतोय. यावर ते म्हणाले, केंद्राकडून १,७५० मॅट्रिक टन ऑक्सिजन साठा मिळत आहे, तसेच ४ लाख ३५ हजार रेमडेसेवीर मिळत आहे. परंतु राज्य सरकार राज्यातील यंत्रणा सक्षम करण्यात कमी पडले आहे. कारण राज्याला मदत करणे ही केंद्राची जबाबदारी व कर्तव्य आहे. राज्याला माल उपलब्ध करण्यासाठी केंद्राशी समन्वय राज्य सरकारने साधला पाहिजे, असा सल्लाही दरेकर यांनी दिला.

दरम्यान, नातेवाईकांना रेमडेसिवीर आणायला सांगू नका, रुग्णालयाने साठा दिलेला आहे. नातेवाईकांना सूचना दिले असताना, रुग्णालयातील रेमडेसेवीर जाते कुठे ? त्याचा काळाबाजार होतोच कसा? असा सवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला. यापुढे असे होता कामा नये, अशी ताकीदही दरेकर यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!