🕒 1 min read
पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपच्या समाधान आवताडे यांनी मोठी आघाडी घेतली असून राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ३७१६ मतांच्या आघाडीने समाधान आवताडे यांचा विजय झाला आहे.
भारतनानांच्या निधनामुळे त्यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यामागे सहानुभूती असल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात असली तरी समाधान आवताडे यांना पंढरपुरात परिचारक गटाचं मोठं समर्थन मिळाल्यामुळे भालके यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या दिग्गजांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला होता.
मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भाजपने पराभूत केल्यामुळे भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याच आनंदाच्या भारत उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. समाधान आवताडे यांचा विजय हा महाविकास आघाडीला थोबाडीत मारल्यासारखा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात. पाच राज्यांच्या निकालामुळे काँग्रेस पक्ष शून्य आणि अस्तित्वहीन झाला आहे. यापुढच्या निवडणुकीतसुद्धा आम्ही संघटनात्मक पद्धतीने काम करणार’, असं देस्खील चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- #पंढरपूर : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या समाधान आवताडेंचा दणदणीत विजय !
- या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या वाघिणीलाच द्यावे लागेल, उद्धव ठाकरेंकडून कौतुक
- विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन, कर्मचाऱ्यांसाठी कार्यगटाची स्थापना
- ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, त्यांनी राजीनामा द्यावा’
- तुम्ही जामिनावर सुटलेले आहात त्यामुळे जास्त जोरात बोलू नका, चंद्रकांतदादांचा भुजबळांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

