मुंबई : आज पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पद्दुचेरी या विधानसभा निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. पाच राज्यात जरी निवडणूक असले तरी संपूर्ण देशाचे लक्ष पश्चिम बंगालच्या निकालांकडे लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर आहे. खेला होबे म्हणून ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते.
संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या नंदिग्राममधून ममता बॅनर्जींनी विजय मिळवला आहे. भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा त्यांनी पराभव केला. टीएमसी 208, भाजप 81 जागा, काँग्रेस 1 आणि इतर 2 जागांवर आघाडीवर आहेत.
यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
तर, ‘पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे
महत्वाच्या बातम्या
- विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन, कर्मचाऱ्यांसाठी कार्यगटाची स्थापना
- ‘नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फेकाफेकीचं राजकारण केलं, त्यांनी राजीनामा द्यावा’
- तुम्ही जामिनावर सुटलेले आहात त्यामुळे जास्त जोरात बोलू नका, चंद्रकांतदादांचा भुजबळांना टोला
- आयपीएलमध्ये सर्वात कमी रक्कम मिळूनही स्मिथ अजूनही भारतात का ? ; ऑस्ट्रेलियन दिग्गज झाले आश्चर्यचकित!
- महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने नाकारले – दरेकर


