🕒 1 min read
उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना रुद्र रुप धारण करत असून,कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या रुग्णांना आता दिवसाला ४६ हजार लिटर ऑक्सिजनची गरज लागत असून, रुग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनमध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत तिपटीने वाढ झाली आहे. मागीलवर्षी कोरोनाची पहिली लाट आली होती. यामध्ये अनेक रुग्ण दुरुस्त होऊन घरी परतले. मागील वेळी मृत्यू दर हा कमी प्रमाणात होता. तर होम आयसोलेशमध्ये सुध्दा अनेकांनी कोरोनाला हारवले होते.
मध्यंतरीचा काही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता कोरोना आटोक्यात आला असे सर्वांना वाटत होते. मात्र अचानक कोरोनाची दुसरी लाट आल्याची घोषणा करण्यात आली. मागील कोरोनाच्या लाटेपेक्षा ही लाट उसळली. यामध्ये गंभीर रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांना दिवसरात्र कृत्रिम ऑक्सिजन द्यावा लागत आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएससी सेंटरमध्ये गंभीर रुग्ण ३७ च्या आसपास आहेत. यांना दररोज कृत्रिम ऑक्सिजन दिला जात आहे.
मात्र रुग्णांची संख्या वाढल्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन देण्यात सुध्दा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. १८ एप्रिलच्या आसपास दररोज १० जम्बो सिलिंडर म्हणजे १३ हजार लिटर कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत होती. अचानक गंभीर रुग्णांची संख्या व त्यांना द्यावा लागणाऱ्या कृत्रिम ऑक्सिजनमध्ये वाढ झाली असून, आता दररोज ३५ जम्बो सिलिंडर म्हणजे ४६ हजार लिटर ऑक्सिजनची गरज भासत आहे. विशेष म्हणजे दिवसातून दोन वेळा ऑक्सिजन भरुन आणण्यासाठी गाडी आहे.
महत्वाच्या बातम्या
- लसीकरणासाठी गर्दी होऊ नये म्हणून कडा या गावात वापरली ‘ही’ पद्धत
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर
- अभिनेत्री हिना खानच्या वडिलांच्या निधनानंतर गौहर खान झाली ‘या’ कारणासाठी ट्रोल
- संचारबंदीमुळे परभणी एसटी महामंडळाला लाखोंचा फटका, प्रवाशी मिळेना !
- काहीजण सुपात आहेत तर काहीजण जात्यात आहेत; CBIच्या धाडीनंतर चंद्रकांतदादांचे सूचक वक्तव्य


