Share

‘नगरमध्ये जीव जात आहेत अन् हसन मुश्रीफ गोकुळच्या निवडणुकीत बोंबलत बसलेत’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील आणि या काळात संपूर्ण संचारबंदी राहील.

अहमदनगरमध्ये तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. मंगळवारी एकाच दिवसात जिल्ह्यात २७९५ नवे बाधित आढळून आले आहेत. तर मंगळवारी दुपारी बारा वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाने २३ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे. अशात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

‘राज्यातील जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत की नाही हे उद्धव ठाकरेंनी तपासून पहाव, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तिकडे ३६०० मतदार असलेल्या गोकुळच्या निवडणूकीत बोंबलत बसलेत. एका एका दिवसात ३०-३५ लोक नगरमध्ये मृत्यूमुखी पडत आहेत. मनसेने तिथे पालकमंत्री शोधून द्या ५००० हजार रुपये मिळवा असे आंदोलन देखील केले. अशात उद्धव ठाकरेंनी छडी घेऊन पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे त्या जिल्ह्यातून हलायचं नाही’ असा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!