🕒 1 min read
मुंबई – महाराष्ट्रात कोरोना चा प्रसार मोठया प्रमाणात झाला असून परिस्थिती हाताबाहेर जात असताना राज्य सरकार केवळ आरोपबाजीत दंग आहे.केवळ केंद्र सरकारवर आरोप करून चालणार नाही तर रुग्णांना योग्य उपचार सेवा सुविधा दिली पाहिजे अशी मागणी होत आहे.
नियोजनाअभावी राज्यात कोरोनाच्या प्रसारावर राज्य सरकार नियंत्रण करू शकले नाही.त्यामुळे केंद्रावर आरोप करणे थांबवा आणि रुग्णांचे जीव वाचवा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
कोरोनाचा कहर राज्यात वाढला आहे. रुग्ण संख्या वाढत आहे.प्रत्येक रुग्णाला बेड, ऑक्सिजन आणि औषधे पुरविण्याकडे राज्य सरकार ने लक्ष द्यावे.कोरोनाला रोखणे ही राज्य सरकार ची जबाबदारी आहे. रुग्णांना सेवा पुरविणे राज्य सरकार आणि स्थानिक महापालिका यांचे काम आहे. केवळ केंद्रावर आरोप करून चालणार नाही. उलट सुलट स्टेटमेंट देणे थांबवा, राजकारण करण्यापेक्षा रुग्णसेवा करा,रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोना संकटात मोदी दिवसातील १८-१९ तास काम करताहेत’, मंत्री गोयल यांचा दावा
- केंद्रात जेवणाची व्यवस्था नाही म्हणून घरी जातोय, म्हणत कोरोना बाधित रुग्णाने ठोकली धूम
- ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हे बालीश राजकारण आता थांबवावे’
- महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत मुख्यमंत्री दोन दिवसात निर्णय घेणार
- लातूरात एकाच दिवसात ५० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बातमी चूकीची, जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा


